*लातूर 109 पैकी 100 निगेटिव्ह, 05 पॉझिटिव्ह तर 04 व्यक्तींचा आवाहल अनिर्णीत*
*लातूर शहर 4, औसा व चाकुर तालुका प्रत्येकी 1 असे एकूण 6 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी*
*उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 62, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 146 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13*
लातूर, ( जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 20 जून 2020 रोजी 109 व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 100 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, 05 व्यक्तींची अहवाल पॉझिटिव्ह तर 04 व्यक्तींचे अहवाल अनिर्णीत आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 34 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 30 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 02 व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती मोती नगर लातूर व दुसरी व्यक्ती अजिंक्य सिटी लातूर येथील आहे. महानगरपालिकेकडून तापसणीसाठी आलेल्या 08 व्यक्तीच्या स्वबपैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो व्यक्ती श्याम नगर लातूर येथील रहिवासी आहे. एक रुग्ण औराद शहाजनी ता. निलंगा, एक रुग्ण मालकोंडजी ता. औसा असे एकूण 5 कोरोना बाधित रुग्ण आढळले, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
आज जिल्ह्यातील सहा रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामध्ये लातूर शहरातील भाग्य नगर, मोती नगर, हत्ते नगर व उस्मानपुरा या भागातील प्रत्येकी एक याप्रमाणे चार, आंधोरा ता.औसा येथील एक व सुगाव तालुका चाकूर येथील एक याप्रमाणे एकूण 6 बरे झालेल्या व्यक्तीचा समावेश आहे. तर आजपर्यंत एकूण 146 रुग्णावर उपचार करून ते बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली.
सद्यस्थितीत कोरोना विलगीकरण कक्षामध्ये एकूण 28 रुग्ण भरती असून त्यापैकी 06 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत व 07 रुग्ण ऑक्सिजन वर आहेत उर्वरीत 15 रुग्णाची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे अशी महिती डॉ. गजानन हलकंचे कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, डॉ. विनायक सिरसाठ विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र विभाग व प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. निलिमा देशपांडे, डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 62, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 146 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13 इतकी आहे.