मराठवाड्यातील तमाम नदीपात्रे वाळू माफीयानी काबीज केली ?
औरंगाबाद (दै.लातूर प्रभात प्र.) ः मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून वहाणार्या नदीपात्रातून अवैद्य वाळू उपसा होत आहे. तक्रारी आल्या, वृत्तपत्रातून बातम्या आल्या, महसूल विभागाने छापे घातले, कारवाया केल्या, दंड वसूल केला तरीही राजरोसपणे अवैद्य वाळू उपसा होतो आहे. शासकीय गौण खनिजाचे नुकसान होते आहे. महसूल बुडतो आहे पण महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी, पेालीस कर्मचारी आपापला पगार चालू आहे तर वाळू माफीयाच्या नादी लागून जीव धोक्यात कशाला घालावा यासाठीच वाळू उपसा करणार्याना महसूल विभाग, पोलीस यंत्रणा वाव देत असेल अशीच चर्चा होताना दिसते आहे.
वाळू उपसा, वहातूक,तस्करीवर गुन्हे होतात, धाडी, पडतात तरीही वाळू उपसा होतच असतो. त्यामूळे स्थानीक पुढार्यानी अनाधिकृतपणे आपापल्या भागातील नदीपात्रे वाळू माफीयाना दान केली की वाळू तस्करानी ती काबीज केली अशीच उलटसूलट चर्चा त्या त्या भागातील शेतकर्यात होताना दिसते आहे.