कोरोना कोविडच्या रुग्णाची
वाढ ही टाळेबंदीमूळेच
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड या महामारी रुग्णाची कालपरवा झालेली वाढ ही टाळेबंदीमूळेच झाल्याची चर्चा होताना दिसते आहे. मागील टाळेबंदी काळात अनेक संशयीत रुग्ण हे रोग लपवून ठेवण्यासाठी किंवा दवाखाण्यात कोंडून राहिल्यानंतर समाजातही छी-भू होईल म्हणून दडून बसलेले असावेत आणी टाळेबंदी शिथील होताच पुन्हा ते आपापल्या काम-व्यवहारात सक्रीय झाल्याने त्यांचा प्रार्दूभाव झाला असेल पंरतू त्यांच्यावर उपचार न करता पून्हा टाळेबंदी लादल्याने आमजनतेतून शासकीय निर्णयावर संताप व्यक्त होताना दिसतो आहे.
कोणताही रोग प्राथमिक अवस्थेत उपचार केल्यावर रोगी बरा होतो पण भितीपोटी दडवून ठेवल्यास बळावतोच टाळेबंदी शिथील होताच कोरोना कोविड बाधीत संशयीत रुग्ण समोर आले आणी उपचारापूर्वीच टाळेबंदी लादली गेल्याने पून्हा टाळेबंदी शिथील होताच पून्हा तिच परिस्थिती निर्माण होईल यासाठी टाळेबंदी उठवून समोर येतील त्यावर उपचार करावेत विनाकारण जनतेला वेठीस धरु नये अशीच लोकभावना व्यक्त होत असून जनतेच्या भावना आणी त्यांच्या जीवन-मरणाचा तमाशा करु नये अशीच चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.