भोकर / सिद्धार्थ जाधव / लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना अडविण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. सोमवारी रात्री भोकर तालुक्यातील रेणापूर येथील सभा आटोपून अशोकराव चव्हाण रात्री आठ वाजेच्या सुमारास भोकरकडे येत असताना भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश कापसे यांच्या बटाळा गावात गाडयांचा ताफा येताच गावातील मराठा आंदोलक मोठ्या संख्येने गोळा झाले होते. चव्हाणांचा ताफा अडविण्याचा ते प्रयत्न करणार होते. परंतु पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावर येण्यापूर्वीच ताफा अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले परंतु कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा, चलेजाव च्या घोषणा दिल्या. पोलीसांना तगडा बंदोबस्त तैनात केला होता या बंदोबस्तामुळे बटाळा गावाला छावणीचे रूप आले होते. मराठा आरक्षणाच्या विषयावरून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नेत्यांच्या सभांना जायचे नाही, कुणाचा प्रचारही करायचा नाही, अशी भूमिका मराठा समाजबांधवांनी घेतली आहे. त्यामुळे राजकीय नेते प्रचाराला आल्यानंतर त्यांना विरोधाचा सामना करावा लागत आहेत. काही दिवसांपूर्वीच कोंढा गावात अशोकराव चव्हाण यांचे वाहन फोडण्याचा प्रयत्न झाला होता.यावेळी अनेकांनावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ किंवा या घटनेचा पडसाद म्हणून की काय त्यानंतर अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांकडून नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येतांना दिसुन येत आहे
वैशिष्ट्यीकृत बातम्या
*लातूर शहरात गणेशोत्सव काळात डीजे / डॉल्बी वापरून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १० गणेश मंडळांवर व १० डीजे/डॉल्बी मालकांवर न्यायालयात खटले दाखल.*
लातूर (पोअका) : लातूर शहरामध्ये सन २०२५ मधील गणेशोत्सव हा दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ...
लोकप्रिय बातम्या
-
लातूर (पोअका) : लातूर शहरामध्ये सन २०२५ मधील गणेशोत्सव हा दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ...
-
बीड(प्रतिनिधी)धारूर येथील शिवाजी महाराज चौक येथील आई मेडिकलचे समोर केज रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढुन फिर्याद...
-
संपादकीय... नौटंकी नको टक्का हवाय को रोना कोविड 19 या महामारी रोगाने जगण्याचे मातेरे करुन सोडले, कशी बशी सुटका होत असतानाच परतीचा पा...
-
*मुंबई :* पुढील २४ तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत रत्नागिरी, ...
-
मुंबई, दि. २९ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्...