लातूर जिल्हा शल्यचिकित्सक संजय ढगे सांगतात, निलंगा येथे सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

लातूर जिल्हा शल्यचिकित्सक संजय ढगे सांगतात, निलंगा येथे सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 



लातूर, (जि.मा.का.) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक १८.०५.२०२० रोजी एकुण ११८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी सर्वच ९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण ३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच ३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत,  निलंगा येथुन ८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ६  व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून २ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, चाकुर येथुन २, अहमदपुर येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लातुर जिल्हयातील असे एकुण २३ स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ०६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह असुन १७व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच बीड जिल्हयातील ७७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ७३  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत व २ व्यक्तींचे अहवाल (खपलेपलर्श्रीीर्ळींश) आले असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हयातील १८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी१६व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे (खपलेपलर्श्रीीर्ळींश) आले असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. असे एकुण आज ११८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन ०४ व्यक्तींचे अहवाल खपलेपलर्श्रीीर्ळींश आले असून १०६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
  निलंगा येथील सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईहून प्रवास करून आलेले आहेत ते कोराळी तालुका निलंगा येथील मूळ रहिवासी असून सध्या ते मुंबईत स्थायिक आहेत तेथून ते प्रवास करून निलंगा येथे दाखल झालेले असून त्यांना निलंगा येथील संस्थात्मक विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.


 

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' भागात १००- १५० मिमी पावसाची शक्यता!*

  *मुंबई :* पुढील २४ तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत रत्नागिरी, ...

लोकप्रिय बातम्या