झरोका
एक - भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या प्रमूखानी बेजबाबदार लोकामूळेच कोरोना-कोविड रोग स्थिरावत नाही तो बळावत आहे असा आरोप केला आहे तो निराधार वाटतो ही जनतेची दिशाभूल कशासाठी करावी हेच कळत नाही, डोकं सून्न झालय.
दुसरा - अरे, रिकामटेकड्या संशोधन परिषदेच्या प्रमूखाना दुसरे-तिसरे कामच नाही. केवळ कोरोना बाधीताची संख्या जाहीर करणे, लस आज येतेय, उद्या येतेय चार, सहा महिण्यात येते आहे असे सांगतात पण कोरोना-कोविड हा विषारी विषाणू रोग कोणामूळे, कशामुळे पसरतो आहे, बेजबाबदार लोक कोन आहेत हे ते स्पष्ट कर करीत नाहीत त्यांचे गौडबंगालच उघडे करतो समजलं का.
एक - अहो बेजबाबदार लोक म्हणजे फिजीकल अंतर न पाळणे, मास्कचा वापर न करणारे हेच लोक जबाबदार आहेत असे म्हणालो त्यात चूक कसली आहे, विषयांतर करु नका.
दुसरा - अरे, शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा कोरोना, कोविड निर्मूलनासाठी निर्बध लादते तेच टाळेबंदीतील नियम पाळत नाहीत म्हणूनच मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी कोरोना, कोविड, बाधीत होत आहेत तेच बेजबाबदार आहेत हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या प्रमूखाना कळत नाही काय, असे अन्यायकारक बेजबाबदार विधान करुन जनतेला कशासाठी फसवणूक करायची याचे उत्तर संशोधक, केंद्र सरकार व राज्य सरकारकडे आहे काय याचा खूलासा कोण करणार आहे याचा खूलासा तू करणार आहेस का हे सांग.
एक - तसे कांहीही नाही पण विनाकारण गफलत होत आहे त्यासाठी गैरसमज होऊ नये यासाठी तसे विधान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या प्रमूखानी केले असावे त्यात गैर काय आहे याचेच आश्चर्य वाटते.
दुसरा - संशोधक, शासन, प्रशासन कांहीच संशोधनात्मक प्रक्रिया, निर्णय घेत नाही. पंरतू जनतेला घाबरविणे, दहशत निर्माण करणे हाच त्यांचा नित्यक्रम आहे असेच वाटते. कोरोना कोविड निर्मूलनासाठी नियम अटी लादणारेच कोरोना कोविड बाधीत होतात पण पोटाची खळगी भरणारे सर्वसामान्य नागरीक, कामगार, शेतमजूर, शेतकरी याना कोरोना कोविडची बाधा होत नाही. तसेच अशा परिस्थितीत वार्तांकन करणार्या पत्रकाराना, रोजगार शोधणार्याना किंवा घाण, गटारीतील कचरा, बाटली, प्लॉस्टीक वेचणार्याना कसा काय कोरोना कोविड रोगाची लागण कशी काय होत नाही हे भारतीय वैज्ञानीक संशोधन समिती प्रमूखानी कळत नसेल तर अभ्यास करुन खूलासा करावा किंवा सामान्य लोकाना बेजबाबदार ठरिवल्या प्रकरणी माफी मागावी अशीच बतावणी होतेय त्यांचे काय !