कोरोना रोगाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम, पोलीसाना प्रोत्साहन द्या
दिल्ली (लातूर प्रभात प्र.) ः कोरोना रोगाचे संकट गंभीर असून केंद्र सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करुन भारत कोरोना मुक्त करावा. कारण या रोगामुळे भारतीय अर्थ व्यवस्थेवर परिणाम होत असून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दिर्घकाळ अर्थात दिड दोन वर्ष तरी लागतील हा धोका ओळखून वैद्यकीय यंत्रणेत सुधारणा करुन वेळीच कोरोना रोग हद्दपर करावा असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे.
कोरोना रोगा मुळे जनता भयभित झाली असली तरी जनता संचार बंदी लॉकडाउन काळात रात्रनदिवस माणूसकी जागृत ठेवून देशभरातील पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरीकांचे रक्षण करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असून शदर पवार यांनी पोलीसांचे अभिनंदही केल्याचे प्रसार माध्यमावरुन खुद्द शरद पवार यांनीच केले आहे.