सरकारकडून गरीबांची चेष्टा

सरकारकडून गरीबांची चेष्टा


मुंबई (लातूर प्रभात प्र.) ः गोर-गरीब जनतेसह निराधार, कामगार, मजूराना तिन महिने पूरेल एवढे धान्य देण्याची घोषणा करण्यात आली त्यानंतर एक महिण्याचे वाटपाची घोषणा करण्यात आली पण प्रत्येकी ५ किलो ऐवजी प्रत्येकी कार्डास ५ कि. तांदूळ देण्यात येत असून केवळ गोरगरीबाची चेष्टाच राज्य सरकारकडून होत असल्याने संतापाची लाट उसळल्याचे बोलले जात आहे. 
 विशेष म्हणजे नेहमी प्रमाणे स्वस्त धान्य दुकानातून नेहमीचे विकतचे धान्य खरेदी केल्यानंतरच मोफत धान्य वाटपाची अट घातल्याने घरात डांबून जगणार्‍या कामगार मजूराकडे पैसे कोठून असणार आणि खरेदी कशी करणार अशी भ्रांत लोकात पसरली असून सरकार निराधार, कामगार, मजूरांची चेष्टा करुन मृत्यूच्या खाईत लोटू पाहत आहे की काय अशीच संतापजनक उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*लातूर शहरात गणेशोत्सव काळात डीजे / डॉल्बी वापरून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १० गणेश मंडळांवर व १० डीजे/डॉल्बी मालकांवर न्यायालयात खटले दाखल.*

       लातूर (पोअका)  : लातूर शहरामध्ये सन २०२५ मधील गणेशोत्सव हा दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ...

लोकप्रिय बातम्या